आमच्या सोबत का यावे ?

  1. सर्वसामान्य लोकांनी सर्वसामान्यासाठी निर्माण केलेले क्रांतिकारी व्यासपीठ म्हणजे सर प्रतिष्ठान.
  2. केवळ प्रश्न नव्हे उत्तर असेल तरच आम्ही प्रश्न उपस्थित करू.
  3. विचार मांडून बाजूला होण्यापेक्षा निवेदने, विनंती व शेवटी आंदोलन करूच.
  4. केवळ सामाजिक संक्रमण नव्हे, तर मानसिक बदल घडविला तरच आपण स्वराज्याकडून सुराज्याकडे जाऊ.
  5. पक्षीय राजकारण आम्ही करणार नाही. पण, राजकारणाला व राजकारण्यांना जमेल तिथे योग्य दिशा देण्याचा प्रयत्न नक्की करू.
  6. कोणत्याही धार्मिक प्रश्नावर कोणत्याही धर्माच्या बाजूने किंवा विरोधात उभे राहणे नाही.
  7. जो धडाडीने कार्य करेल त्यास योग्य संधी दिली जाईल, हे नक्की.
  8. विचार वेगळे, कृती वेगळी उत्तर मात्र सर्वाना अपेक्षित असेच असेल.
  9. आजवर ज्या प्रकारे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक संक्रमण झाले नाही ते आम्ही करूच.
  10. अनेकांना आपण तपासून पाहिले. मग आमच्यासोबतही चार पाऊले चालावे. आपली पाऊले पदयात्रा नव्हे क्रांतिकारी वाटचाल ठरतील